प्राकृतिक भूगोलाची ओळख
1.1 व्याख्या, 1.2 व्याप्ती, 1.3 शाखा, 1.4 महत्व
प्रस्तावना
भूगोल
हे शास्त्र असून यामध्ये प्रादेशिक विभिन्नतेचा व प्रदेशा प्रदेशातील परस्पर
संबंधाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या बदलत्या अविष्कारांचे अचूक, सुसंबधित व
संयुक्तिक वर्णन आणि विशदीकरण करणारे हे शास्त्र आहे. भूपृष्टाच्या व मानवाच्या
घनिष्ठ संबंधाचा अभ्यास भूगोलात केला जातो.
प्राचीन
काळापासून म्हणजेच ग्रीक,
रोमन कालखंडापासून भूगोलाचा अभ्यास लिखीत स्वरूपात सूरू झाला. या काळात पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल एवढेच
अभ्यासक्षेत्र होते. पृथ्वीवरील विविध प्रदेशातील माहिती, तेथील
डोंगर, नद्या, पर्वत, हवामान, पिके, वनस्पती,
प्राणी यांचे वर्णन यामध्ये केले जात होते. ग्रीक तज्ञ इरेस्टोथेनिस
यांनी सर्वप्रथम जिऑग्राफीया Geographia हा शब्दप्रयोग भूगोलासाठी
केला. म्हणून त्यांना भूगोलाचा जनक असे म्हणतात. Geo म्हणजे पृथ्वी व graphy म्हणजे वर्णन या
दोन शब्दाचा geography हा शब्द बनला. पृथ्वीचे वर्णन म्हणजे
भूगोल अशी भूगोलाची व्याख्या सुरूवातीस होती.
A. भूपृष्ठ हे मानवाचे
घर असून भूपृष्ठाच्या व मानवाच्या घनिष्ठ संबंधाचा अभ्यास भूगोलात केला जातो
(आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद 1905).
B.भूगोल या शास्त्रामध्ये प्रादेशिक विभिन्नतेचा व प्रदेशा
प्रदेशातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो (ब्रिटीश परिशिष्ट मंडळ 1950).
C. भूगोल हे पृथ्वीच्या
पृष्ठभागावरील बदलत्या अविष्कारांचे अचूक, सूसंबंधित व
संयुक्तिक वर्णन व विशदीकरण करणारे शास्त्र आहे. याप्रमाणे भूगोलाच्या व्याख्या
आहेत.
पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल एवढाच अर्थ आधुनिक
काळात नाही. भूगोलातील सूक्ष्म अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय भूगोल परीषदेने 87 अपशाखा मान्य केल्या आहेत. भूगोलाच्या प्रमूख दोन शाखा आहे. 1. प्राकृतिक भूगोल 2. मानवी भूगोल. यामधील प्राकृतिक
भूगोल ही महत्वाची उपशाखा असून प्राकृतिक भूगोल हा शब्द Physical Geography
या दोन शब्दापासून तयार झाले आहे. Physical म्हणजे
प्राकृतिक व geography म्हणजे भूवर्णन. निसर्ग निर्मितीचा
अथवा निसर्ग परिस्थितीचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात करतात.
1.1 प्राकृतिक भूगोल
म्हणजे प्रकृती संदर्भातील अभ्यास. या अभ्यासात सांगलीतील हवामान, दंडोबाच्या डोंगररांगा, धबधबे, ताकारीतील अभयारण्य, कृष्णा नदीप्रणाली, मृदा, तसेच हिंदी महासागर, पर्वत
या निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास केला
जातो. याखेरीज प्राकृतिक भूगोलामूळे विविध प्रश्नांची उकल होते. उत्कृष्ट बेदाणे
तासगाव परिसरात का?, हळदीचे उत्पादन सांगलीत का?, सफरचंद काश्मीरमध्ये का?, चहा दार्जिलिंगमध्येच का?
यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून
समजतात.
प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल.
१.निसर्ग
निर्मितीचे शास्त्रशुध्द विवेचन म्हणजे प्राकृतिक भूगोल होय.
२.पृथ्वीवरील मृदावरण
(शीलावरण), वातावरण आणि जलावरण यांमधील सर्व घटकांचा
विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे प्राकृतिक
भूगोल
३.वेबस्टर:
भूपृष्टरचनेचा व त्यावरील जमीन, पाणी, व हवामानातील घटकांचा, प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो.
४.डब्लू.
एम़. डेव्हीस:
पृथ्वी व मानव यांच्या संबंधातील घटकांचा व मानवा सभोवताली प्राकृतिक घटकांचा
अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो.
५. प्राकृतिक भूगोल
म्हणजे प्राकृतिक स्थलविज्ञान होय.
६.एम. यीटस 1967- प्राकृतिक भूगोलशास्त्र हे
भूपृष्टावरील विविध वैशिष्टयांचा, भूआकाराचा व त्यांच्या
क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
७.ओर्थर होम्स – प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल असून
यामध्ये भूरुपशास्त्र, सागरशास्त्र,
वातावरणशास्त्र व हवामानशास्त्र यांचा समावेश होतो.
८.स्ट्रॉलर- नैसर्गिक शास्त्रातील पृथ्वीविषयक अभ्यास करणाऱ्या प्राकृतिक भूगोल या
शाखेत भूरुपशास्त्र, सागरशास्त्र,
वातावरणशास्त्र व हवामानशास्त्र यांचा समावेश होतो.
या वरील
व्याख्येवरून पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो.
भूरूपे, ऋतूमान,
जमिन, प्राणी, वनस्पती
यांच्या क्षेत्रीय वितरणाचा तौलनिक व विश्लेषणात्मक अभ्यास प्राकृतिक भूगोलात होतो.
१.२ प्राकृतिक भूगोलाचे व्याप्ती Scope
of Physical Geography
प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती
प्रचंड मोठी आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरण, जलावरण,
शीलावरण हे प्रमूख व्याप्ती / क्षेत्र आहे. याशिवाय पर्वत, पठारे, मैदाने, जलप्रणाली,
विविध कारकामूळे तयार होणारी भूरूपे, तसेच वनसंपदा,
प्राणी यांचे भूरचनेनूसार, हवामानानूसार वितरण
व वैशिष्टये यांचा अभ्यास होतो.
१ शिघ्र
हालचालीचा: अभ्यास भूकंप,
ज्वालामुखी, त्सुनामी यासारख्या शिघ्र
हालचालीमुळे जगात अनेक ठिकाणी नौसर्गिक आपत्ती आलेली दिसते. भारतातील या दशकातील
गुजरात येथील भूकंप, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या
त्सुनामी लाटा, सद्याचा ग्रिनलँडचा ज्वालामुखी या सर्वाच्या
अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो.
२ सिद्धांत व संकल्पना यांचा अभ्यास: प्राकृतिक भूगोलात
अनेक सिद्धांत व संकल्पना यांचा अभ्यास होतो. विस्फोट सिद्धांत (Big bang
theory), विश्वप्रसरण सिद्धांत, वेगनरचा प्लेट टेक्टॉनिक्स सिद्धांत, सागरतळ विस्तार सिद्धांत, जेट सिद्धांत, मोसमी सीमा सिद्धांत असे विविध सिद्धांत अभ्यासले जातात. या संकल्पना व
सिद्धांत वेगवेगळ्या काळात विकसित झाले आहे. त्याचा अंतर्भाव आता प्राकृतिक
भूगोलाच्या अभ्यासात केला असल्याने प्राकृतिक भूगोल गतिशील बनला आहे.
३
अंतराळाचा अभ्यास: विविध देशानी 1969 सालापासून सोडलेले उपग्रह व अंतराळ मोहिमा यांच्याव्दारे वातावरणाची
/वायूमंडळ,चंद्र, मंगळ, गुरू ग्रहाविषयीची उपलब्ध प्राकृतिक माहिती प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात
समाविष्ठ करण्यात आलेली आहे. यामुळे व्याप्ती प्रचंड मोठी बनली आहे.
४ नैसर्गिक
बदलाचा अभ्यास: भूरूपे, ऋतूमान, जमिनी, वनस्पती, प्राणी
यांच्याव्दारे नैसर्गिक परिस्थिती ही मानवी जीवन प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष घडवित असतात.
त्यासाठी नैसर्गिक परिस्थितीच्या क्षेत्रीय वितरणाचा तौलनिक व विश्लेषणात्मक
अभ्यास करणे आवश्यक असते.
५
वातावरणीय अविष्कार: प्राकृतिक भूगोलात निसर्गचक्रांचा
अभ्यास केला जातो. सौरउर्जा,
तापमान, पर्जन्यमान, हवामान,
वातावरणीय अविष्कार, वातावरणाची घटना- संरचना,
हवेचे घटक अशा विविध घटकाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो.
गतीमान वायूमंडलामध्ये कायम बदल घडत असतात. जागतिक तापमान वाढ व त्यामुळे झालेले
परिणाम यांचा अभ्यास असो वा मुंबईत एकाच दिवशी सर्वाधिक पावसाची नोंद याविषयीचा
अभ्यास केला जातो.
६ निसर्गचक्र व भूगर्भाचा अभ्यास: जलचक्राव्दारे
वातावरण व जलावरण यांच्यात देवाणघेवाण / चलनवलन होत असते. मृदा-जलसंतुलन व
वनस्पतीच्या वाढीसाठी उपलब्ध होणारे पाणी व त्याच्या उष्णतेचा अंदाजपत्रकाबरोबर
असणारा संबंध यांच्या अभ्यासाला आता प्राकृतिक भूगोलात महत्वाचे स्थान आहे. भूहालचाली,
भूस्तरामधील घडामोडी, मृदा, खनिजे यांचा समग्र अभ्यास होतो.
याशिवाय
उदाहरणावरून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती
लक्षात येते.
अ.
भूगोलाच्या
सर्व सांस्कृतिक शाखाच्या अभ्यासात प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान अनिवार्य व आवश्यक
असते.
निरनिराळया देशातील लोकांच्या जीवनक्रमातील
फरक प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून समजतो. संक्रात, कालबैसाखी, होळी, दिवाळी यासारखे सण,
पंरपरा प्राकृतिक घटकातील बदलानूसार साजरी होतात. कालबैसाखी हा सण पावसाळयाच्या सुरूवातीस तर
दिवाळी हिवाळयात व होळी हिवाळा संपल्यानंतर साजरी होते. यावरून प्राकृतिक भूगोल हे
समाजशास्त्रीय संबंध स्पष्ट करते.
आ. संरक्षणशास्त्र,
इ. विविध
वस्तूचे उत्पादन पेटंट:
बासमती तांदूळ व हळद
ई. ऋतूमानी
परिवर्तनाचे अर्थिक- सामाजिक परिणाम,
उ. नदी
जलवाटप समस्या,
ऊ. लोकसंख्या वितरण व स्थलांतर,
ऋ.
वाहतूक
व वसाहतीची निर्मिती या सर्वाच्या अभ्यासाचा पाया प्राकृतिक भूगोल आहे.
१.३ प्राकृतिक भूगोलाचे उपशाखा Branches of Physical Geography
१.३ प्राकृतिक भूगोलाचे उपशाखा Branches of Physical Geography
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा पुढीलप्रमाणे
आहेत.
1 खगोलशास्त्र-
या विषयात पृथ्वी एक ग्रह आहे व अवकाशातील त्याची गती,
सूर्य व पृथ्वी संबंध यांचा अभ्यास या शाखेत केला जातो. सुर्यमाला,
तिची उत्पत्ती, ग्रह, उपग्रह, तारे,
उल्का, धूमकेतू इ. अभ्यास केला जातो. ग्रह, उपग्रह, ताज्यांची
अंतरे, अक्षांश, रेखांश,
परिभ्रमण कक्षा, गुरूत्वाकर्षण शक्ती,
गती, वस्तूमान
यांची माहिती या शाखेतून दिली जाते. गणिती भूगोल व
नकाशाशास्त्र या खगोलशास्त्र उपशाखा म्हणून ओळखल्या जातात.
2 भूरचनाशास्त्र- पृथ्वीवरील भूरूपामध्ये सातत्याने बदल
होत असतात. काळानूसार भूरचनेमध्ये
होणाज्या बदलाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. ही प्राकृतिक भूगोलाची
अत्यंत प्रगत शाखा असून यामध्ये पृथ्वीच्या भूकवचाची निर्मिती, पृथ्वीचे अंतरंग,
खडक व खडकाचे स्तररचना
यांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. खंड व महासागर यांची निर्मिती, भू-अंतर्गत व बाह्यशक्ती यामूळे तयार होणारे भूआकार अथवा
भूआकारात होणाज्या बदलाच्या प्रकियांंचा अभ्यास या ज्ञानशाखेत केला जातो. भूगोलामध्ये
वर्तमानकालीन अभ्यास फार महत्वाचा असतो,
पण वर्तमान भूरूपे समजून
घेत असताना भूतकालीन विकासकम समजून घेणे आवश्यक असते.
3 सागरशास्त्र-
पृथ्वी पृष्टभागाचा 71% भाग जलव्याप्त असल्याने भूभागापेक्षा या
भागात आढळणारी संपत्ती जास्त आहे. भूगोलाच्या या शाखेमध्ये महासागराची तळरचना,
सागरी लाटा, सागरजल क्षारता,
खनिजे, सागरी जीवसृष्टी,
सागरजल पातळीमध्ये होणारे बदल व
त्याचे परिणाम, जलमार्ग, सागरी
प्रवाह यांचा सखोल अभ्यास केला जातो. सुनामी लाटा, महासागरी
भूकंप, ज्वालामुखी, महासागरी
आवर्त या आपत्तीचा देखील यामध्ये केला जात आहे. पृथ्वीवरील 1/3
लोकसंख्येची अन्नाची गरज प्रत्यक्ष मासे व अप्रत्यक्षरित्या सागरावर आधारीत
व्यवसायावर अवलंबून आहेत. प्राणी भागवतात.
उदा. गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे हे पर्यटनाचे आकर्षन आहे. यावर हॉटेल व
पर्यटन व्यवसाय विकसित झालेला आहे. गोव्यातील National
Institute of Oceanography ही संस्था सागरशास्त्राचा अभ्यास करते.
4 मृदाशास्त्र- पृथ्वीवर सर्वत्र सारख्याच गुणधर्माच्या
मृदा आढळत नाहीत तर त्याचे प्रदेशानुसार गुणधर्म बदलत असताना दिसतात. अशा मृदाचे
अध्ययन मृदाशास्त्रात केले जाते. या शाखेमध्ये मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक, जनन खडकापासून मृदा निर्मिती क्रिया, मृदा वितरण,
मृदेचा रंग, बंध,
पोत, जलसंधारण शक्ती,
संरचना, मृदेची जाडी हे
गूणधर्म या घटकाचा अभ्यास करतात. याशिवाय मृदा धूप व तीचे सर्वधन कसे करावे यांचा अभ्यास केला जातो. मृदेनुसारच वनस्पती
जीवन व पिके अवलंबून असल्याने मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे. त्यामुळे प्राकृतिक
भूगोलाची मृदाशास्त्र ही महत्वाची उपशाखा आहे.
5 हवामानशास्त्र-
या शाखेमध्ये पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीवर सर्वत्र
हवामान सारखे आढळत नाही. हवामानानूसार
वेगवेगळया प्रदेशाचे वर्गिकरण या शाखेत केले जाते. हवामानाचे प्रकार,
वातवरणाचे विविध थर, सौरउर्जेचे वितरण,
वायूभार, वारे, पर्जन्य, आवर्ते,
धूके, उच्चस्तरीय जेट वारे,
दृश्यता यांचा सुक्ष्म अभ्यास या शाखेत केला जातो. हवेचा,
हवामानाचा शास्त्रीय अभ्यास करून भविष्यकालीन हवामानाचा अंदाज या
शाखेव्दारे वर्तवला जातो. वनस्पती, प्राणी यांचे प्रकार व वितरण हे हवामान हा
घटक निश्चित करतो. मानवाचा पोशाख, घरांची रचना, शरीरयष्टी,
चेहर्रयाची ठेवण,
कार्यक्षमता ही हवामानानुसार ठरते.
1.4 प्राकृतिक भूगोलाचे महत्व
1. मानवी भूगोलाचा पाया
प्राकृतिक
भूगोलामध्ये वातावरण, जलावरण, शीलावरण हे प्रमूख व्याप्ती क्षेत्र जरी
असले तरी भूगोलाच्या सर्व सास्कृतिक शाखाच्या अभ्यासामध्ये प्राकृतिक भूगोलाचे
ज्ञान अनिवार्य व आवश्यक असते. संरक्षणशास्त्र, विविध
वस्तूचे पेटंट, ऋतूमानी परिवर्तने व त्याचे सामाजिक परीणाम,
नदीजल वाटप समस्या, नद्याजोड प्रकल्प, लोकसंख्या वितरण व स्थलांतर, नागरीकरण, वाहतूक व वसाहतीची निर्मिती या सर्वाच्या अभ्यासामध्ये प्राकृतिक भूगोलाचे
अनन्यसाधारण स्थान आहे.
आंतरविद्या
अभ्यासामुळे भूकंपशास्त्र, ज्वालामुखी, विज्ञान, तबक भूरचना, सागरतळ विस्तार, तेल वायू भूशास्त्र, भूजलविज्ञान, भूचुंबकत्व, अवसाद विज्ञान अशा अनेक
शास्त्रातील निष्कर्षाचा संदर्भ आता प्राकृतिक भूगोलात अनिवार्य बनला. वेगनरचा भूखंडवहन सिंद्धात हे याचे उत्तम
उदा. आहे. त्यामुळे प्राकृतिक भूगोल आता भारदस्त बनत आहे. प्राकृतिक भूगोलाच्या
आधुनिकीकरणाचा उपयोग प्राकृतिक भूगोलावर आधारित असलेल्या मानवी भूगोलाच्या सर्व
शाखांना विशेषत: भूराजनिती,
राजकीय भूगोल, मानवी
भूगोल, नगर व
ग्रामीण अधिवास
भूगोल तसेच इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांना
होत आहे. या वाय
2 अर्थिक महत्त्व:
अ. उद्योगधंदे:
उद्योगाचे स्थान
व निर्मिती प्राकृतिक भूगोलानुसार होते. खनिजे, पाणी, हवामान या
प्राकृतिक घटकानुसार उद्योगधंदे विकसित होतात. उदा. मुंबई येथील उष्ण व दमट हवामानामुळे सूती वस्त्रोद्योग स्थापना झाली. लोहपोलाद उद्योगासाठी मुबलक पाणीपूरवठा आवश्यक
असल्याने भारतात नद्याकाठी हे उद्योग स्थापन झालले आहे. गोदावरी
नदीखोऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात विविध खनिजांचे साठे सापडत असल्याने उद्योगधंदे
स्थापन झालेले आहेत. याचाच अर्थ प्राकृतिक
भूगोलाच्या अभ्यासाशिवाय कोणत्याही उद्योगाचे
स्थानिकिकरण
व्यवस्थित करता येणे शक्य नाही. हवामानुसार एखाद्या ठिकाणाचे लोक कोणता व्यवसाय
करतील हे निश्चित होते. राजस्थान व गुतरात येथे पाउस नसल्याने तेथील लोक
अर्थाजनासाठी व्यापारी बनले.
ब. कृषी व्यवसाय: प्राकृतिक
भूगोलातील वातावरणशास्त्रात पर्जन्याचा अभ्यास होतो. पर्जन्याच्या प्राप्तीनुसार व तापमान, आर्द्रता यानुसार शेतीप्रकार
निश्चित होतात. कारण
प्रत्येक पिकाची पाणी, तापमान व मृदेची गरज भिन्न असते. म्हणून उष्ण व समशितोष्ण
कटिबंधातील देशात पीकांची विविधता आढळते. पर्वतीय व डोंगराळ प्रदेशात शेती करणे
अवघड व कष्ठाचे असते तर मैदानी प्रदेशात सपाटीकरणाचा व जलसिंचनाचा खर्च कमी
असतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे या विधानावरून भारतातील
अर्थव्यवस्था व शेतीयोग्य प्राकृतिक रचना आहे
हे समजते.
दूष्काळ पडल्यानंतर अन्नधान्याची आयात
करावी लागत असल्याने अर्थव्यवस्थवर ताण पडतो. त्यामूळे
अवर्षण
भागात पशुपालनावर अर्थिक जीवन व उद्योग हे उपलब्ध प्राकृतिक रचनेनुसार
सुरू होतात.
क.पर्यटन: पर्वतीय प्रदेश, वने, समुद्रकिनारे,
प्राणी व पक्षी संपदा, संस्कृती, धर्मस्थळे व ऐतहासिक वास्तू पर्यटकांना मोहात
पाडतात. गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे हे पर्यटनाचे
आकर्षन आहे. यावर हॉटेल व पर्यटन व्यवसाय विकसित झालेला आहे. मसुरी,
नैनीताल, दार्जिलिंग या भारतातील उत्तरेकडील पर्यटनस्थळांचा विकास हिमालयातील
बर्फाळ व वनाच्छादीत क्षेत्रामुळे झाला आहे. मात्र या पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत
किंवा नाही हे प्राकृतिक भूगोलाचा
अभ्यासने समजते.
ड. मासेमारी व खाणकाम: जगातील
कित्येक देशांची अर्थव्यवस्था ही मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहे. माश्याची
पैदास उथळ समुद्रकिनारे व प्लॅक्टन
वनस्पतींची उपलब्धता या विशिष्ट प्राकृतिक
ठिकाणी होते. प्राकृतिक भूगोलातील समुद्रतळरचना व हवामानाचा अभ्यास समजून
घेतल्याशिवाय मासेमारी सुरक्षित करणे शक्य नाही.
इ. वाहतूक: प्राकृतिक घटकांनुसार रस्ते,
लोहमार्ग, जलमार्ग व विमानमार्ग उभारणे वा आखणे यांचा खर्च, टिकावूपणा व
सुरक्षितता संबंधीत आहे. पर्वतीय व
डोंगराळ प्रदेशात रस्ते व लोहमार्ग बांधणी करताना भराव टाकावे लागतात अथवा डोंगर
कापावे लागत असल्याने खर्च जास्त येतो. याउलट मैदानामध्ये कमी खर्चात रस्ते व
लोहमार्ग कमी खर्चात उभारणे शक्य असते. बंदरे उभारणी करताना सागरतळ, सागरजलाचा व
नद्यातील गाळांचा अभ्यास करावा लागतो. विमानतळ वा हवाईअड़डे तयार करताना वारे,
वायुभार व भूरूपे यांचा अभ्यास करावा लागतो. पावसाच्या प्रमाणानुसार सर्व वाहतूक
प्रकारामध्ये बांधणीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते.
3 सामाजिक शास्त्रामधील महत्त्व
समाजशास्त्रामध्ये समाज, समाजव्यवस्था,
धर्म, जाती, वंश,
पंरपरा, सण,
संस्कृती, समाजाच्या
मानसिकता व हालचाली, वाढ
याबद्दल अभ्यास केला जातो. प्राकतिक घटकानूसार धर्मव्यवस्था निर्माण झाली आहे.
उदा. इस्लाम धर्म वाळवंटी प्रदेशामध्ये निर्माण
झाला आहे. वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा असणारे जास्त तापमान व सूर्यप्रकाश
यामूळे कोणतेही कार्य करता येत नाही.
चंद्रोदय झाल्यानंतर मात्र सर्व कार्यास सुरूवात होते,
त्यामूळे इस्लाम धर्मामध्ये चंद्राची पूजा केली जाते. याउलट हिंदू
धर्मामध्ये सूर्याची पूजा केली जाते.
संक्रात, कालबौसाखी,
होळी, दिवाळी यासारखे सण, पंरपरा
प्राकृतिक घटकातील बदलानूसार साजरी होतात. कालबौसाखी हा सण पावसाळयाच्या सुरूवातीस
तर दिवाळी हिवाळयात व होळी हिवाळा संपल्यानंतर साजरी होते. यावरून समाजशास्त्रीय घटकांचा अभ्यास सखोल करण्यास प्राकृतिक
भूगोल मदतणीस ठरतो.
प्राकृतिक भूगोलातील नद्यावरूनच
विविध संस्कृत्यांची नावे आहेत. उदा. सिंधू संस्कृती, नाईल संस्कृती. तेथील
भूपृष्ठरचना, पाण्यातील घटक, त्यावर आधारीत पिके व त्यापासून तयार होणारा आहार
यांच्या एकूण परिणामातून विचारांची व नितीची निर्मिती होते. मानवी शरीरावर
परिणाम करणाऱ्या पंचमहाभूते ही समाजव्यवस्थेवर परिणाम करीत असतात.
इतिहास म्हणजे कालानुक्रमे
घडणा·या घटनाची संगती लावणे व त्यातून ऐतहासिक प्रकियेविषयी
विचार व्यक्त करणे. यूद्ध, लढाई,
स्वारी, साम्राज्य
यांचा प्रकार हा प्राकृतिक भूगोल नुसार ठरतो. उदा. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना डोंगराळ आहे
हे जाणून घेउून गणिमी काव्याचे तंत्र युद्धासाठी निवडले व संरक्षणाच्या हेतूने
सर्व किल्ले डोंगर माथ्यावर बांधले. पहिले व दुसरे महायुद्धाचा इतिहास जाणून घेत
असताना विविध देशाची प्राकृतिक रचना समजून घ्यावी लागते. यावरून प्राकृतिक भूगोलाचे महत्व इतिहासाच्या अभ्यासामध्ये आहे हे दिसून येते.
4 राजकिय महत्त्व:
राज्यशास्त्रामध्ये विविध देशाचे नियम,
कायदे, शासनपद्धती
व इतर देशाशी असणाऱ्या
संबंधाचा (राजनिती) अभ्यास केला जातो. भूराजनिती व प्राकृतिक भूगोल यांचा घनिष्ठ
संबंध आहे. भारताची राजस्थानची वाळवंटी सीमा व
गुजरात, कोकण, कारवार,
मलबार, कोरोमंडल
किनारे त्याचावर
पाकिस्तानकडून धोका आहे
व उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वताकडून चीन, भूतान, नेपाळ देशाकडून केला जाणारा सीमांचा दूरूपयोग यानुसार भारताला इतर देशांशी संबंध ठेवावे लागतात.
देशातील महत्वाच्या खिंडी व त्यांच्या परिसरातील वांशिक वितरण यांचा सखोल
अभ्यास भारतास करणे आवश्यक आहे. हिमालयातील कारगील
युद्ध व मुंबईवरील हल्ला यामधून प्राकृतिक
भूगोलाचे महत्व भूराजनितीमध्ये कसे आहे हे स्पष्ठ होते.
प्राकृतिक भूरचनेनुसार जगातील विविध देशाचे आंतरसंबंध
ठरलेले आहेत. इस्त्राईल
सारख्या चोहोबाजूने भूसीमा असणारे देशाचे संबंध हे जपानसारख्या चोहोबाजूने जलसीमा
असणाऱ्या देशापेक्षा भिन्न असतात.
तेल निर्यात करणारे आखाती देशाचे
संबंध जगामध्ये सलोख्याचे असणे गरजेचे ठरते. जगामध्ये कोणत्या देशाची अधिसत्ता
असेल हे देखील प्राकृतिक रचनेनुसार ठरते हे विविध देशातील तज्ञांनी
सिद्धांतामधून स्पष्ठ केले आहे. ब्रिटीश दर्यावादी होते व त्याची राजकीय
साम्राज्यविस्ताराची प्रवृत्ती इग्लंडच्या प्राकृतिक रचनेनुसार निर्माण झालेली
आहे. इग्रजांनी जगातील विविध देशाचा प्राकृतिक भूगोल जाणल्यानेच त्याचा
साम्राज्यावर सूर्यास्त होत नव्हता.
भूराजनिती व प्राकृतिक भूगोल यांचा घनिष्ठ संबंध आहे.
भारताची गुजरात, कोकण, कारवार, मलबार, कोरोमंडल किनारे त्याचा पाकिस्तान व चीन देशाकडून केला जाणार दूरूपयोग,
देशातील महत्वाच्या खिंडी व त्यांच्या परिसरातील वांशिक वितरण यांचा
सखोल अभ्यास भारतास करणे आवश्यक आहे. कारगील युद्ध व मुंबईवरील हल्ला प्राकृतिक
भूगोल व भूराजनिती यातील सहसंबंध स्पष्ठ करतात. जगातील विविध देशाचे इतर देशाशी
असणारे संबंध ही राजकीय घटना त्या देशाच्या प्राकृतिक भूरचनेनुसार ठरलेली दिसते.
तसेच जगामध्ये कोणत्या देशाची अधिसत्ता असेल हे देखील विविध देशातील तज्ञांनी
सिद्धांतामधून स्पष्ठ केले आहे. ब्रिटीश दर्यावादी होते व त्याची राजकीय
साम्राज्यविस्ताराची प्रवृत्ती इग्लंडच्या प्राकृतिक रचनेनुसार निर्माण झालेली
आहे. इग्रजांनी जगातील विविध देशाचा प्राकृतिक भूगोल जाणल्यानेच त्याचा
साम्राज्यावर सूर्यास्त होत नव्हता.
५. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील
महत्त्व:
हवामानाशी संबंधित पूर, दुष्काळ,
चक्रिवादळे यासारख्या आपत्ती आहेत. प्राकृतिक
भूगोलाच्या हवामानशास्त्र या उपशाखेत पर्जन्यावर परीणाम
करणाऱ्या घटकांचा व पर्जन्य वितरणाचा अभ्यास होतो.
अतिवृष्टीमुळे कोणत्या भागात नद्यांना पूर येतील याचे पुर्वानुमान मॉडेलची
निर्मिती करून प्राकृतिक
भूगोलात काढता येते. नद्यांकाठी असणारे वसाहतीक्षेत्र कोणत्या ठिकाणी स्थलांतरीत
करावे याचे उत्तर भूरूपांच्या अभ्यासातून प्राकृतिक भूगोलात समजते. अवर्षण व पर्जन्यछायेच्या प्रदेशांची निर्मिती
हे घटक पर्जन्याचे प्रकार अभ्यासल्याने समजतात. या क्षेत्रात जलसिंचन कसे केले
जावे हे प्राकृतिक
भूरचनेनुसार निश्चित केले जाते. वातावरणीय दाबातील फरकामुळे वारे व चक्रिवादळे निर्माण होतात. यांचे प्रभावक्षेत्र हवामानशास्त्रात
अभ्यासतात.
भूअंतर्गत
हालचालीमुळे त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, दरड कोसळणे, भूमीपात होणे यासारख्या
आपत्ती घडून येतात. प्लेट टेक्टॉनिक्स याच्या अभ्यासातून ज्वालामुखी, भूकंपप्रवण
क्षेत्र कोठे आहे याची माहिती समजते. मंद हालचालीच्या परिणामातून दरड कोसळणे,
भूमीपात या नैसर्गिक आपत्ती घडतात. थोडक्यात
नैसर्गिक आपत्तीची कारणे समजल्यास त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. म्हणूनच
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा प्राकृतिक
भूगोल हा पायाभूत विषय आहे.
६.जागतिक समस्या सोडविण्यासाठीचे
महत्त्व
मृदाधूप,
जागतिक तापमान वाढ, पाणी नैसर्गिक साधन संपदेचे संरक्षण, सागरजल पातळीत बदल
यासारख्या समस्या जगास भेडसावत आहेत. सद्या ओझोन वायूचा क्षय, जंगलतोड यामुळे
पृथ्वीवर सर्वत्र तापमानवृद्धी होत आहे. या समस्येच्या परिणामातून ध्रुवीय
प्रदेशातील हिमक्षेत्र वितळून सागरजलाची पातळी वाढत आहे. जगाची ४० टक्के
लोकसंख्या सागारी किनारी अधिवास करते. या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे.
तटवर्ती प्रदेशात सागराचे आक्रमन वाढत आहे. त्याचा परिणाम किनारी प्रदेशातील भूमी
उपयोजन व वसाहतीवर होत आहे. हा अभ्यास
प्राकृतिक भूगोलात होत असल्याने दिवसेन दिवस प्राकृतिक भूगोलाचे महत्व वाढत आहे.
वातावरणीय बदलांचा परिणामातून पृथ्वीवरील काही
प्रदेशात पावसाचे प्रमाण घटत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा सतत वापर वाढत आहे. या वापरामुळे भूजल पातळी खाली
जात आहे. या संपदाचे सरंक्षण करण्यासाठी भूगर्भरचनेचा अभ्यास व खडकांचे प्रकार आणि
संरचना अभ्यासणे गरजेचे ठरते. भूस्तर रचना हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास विषय असून
त्याआधारे पाणलोटविकासाचे नियोजन करता येते. पाणी अडवणे, समपातळीत बांध व चर खोदणे
यासाठी भूरूपाचा अभ्यास करणे आवश्यक असते. प्राकृतिक भूगोलातील हा अभ्यास यामुळे
महत्वपूर्ण ठरतो.
मृदा हा
जीवनाचा आधार आहे. मृदा धूपीमुळे उत्पादनक्षम सुपीक मृदा थराचे व
पोषणमुल्यांचे वहन होते. जगाची लोकसंख्या वाढत आहे मात्र उत्पादनक्षम सुपीक क्षेत्राची
घट मृदा धूपीमुळे होत आहे. भविष्यातील अन्नाची गरज भागविण्यासाठी मृदाधूप रोखणे
गरजेचे आहे. मृदेची निर्मिती खडकांच्या विदारणातून होते. विदारणाचा व मृदेचा
अभ्यास भूरचना व हवामानाबरोबर केल्यामुळे मृदा धूपीची कारणे समजतात व उपाययोजना
काय असाव्यात याचे आकलन प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून होते. मृदा क्षारपड होणे, मृदेचे अवनतीकरण व
पाणथळीकरण या समस्यांच्या निराकरणासाठी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्वपूर्ण व
पूरक ठरतो.
वाढत्या लोकसंख्यामुळे नदी जलवाटप समस्या खूपच तीव्र
बनलेला आहे. कावेरी, गंगा, जॉर्डन, कृष्णा,
ब्रम्हपूत्रा या नद्याच्या जलवाटप संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. हे जलवाटप करण्यासाठी नद्यांच्या खोऱ्यात
पडणारा पाऊस, त्याचा काळ, तेथील पाण्याचे होणारे बाष्फीभवन व पावसाच्या
आकडेवारीतील ऋतूमानी बदल, सरासरी, जादा वा कमी पावसाची वर्षे सर्वाचा विचार करणे
आवश्यक असते. हे सर्व घटक प्राकृतिक भूगोलात सद्या अभ्यासले जात आहेत.
जमिनीची
धूप थांबवल्याने जलाशयातील गाळांचे संचयन कमी होते व धरणांचे आयूष्य वाढविण्यासाठी
पाणलोट क्षेत्राच्या अभ्यासाला व संशोधनाला आगळेवेगळे क्षेत्र प्राकृतिक
भूगोलामुळे उपलब्ध आहे. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोल हा उपयोजनात्मक बनलेला दिसतो.
मानवी क्रियामुळे व अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय हाणी व जौविक विविधतेची हानी मानवाने केली आहे. यामुळे
निर्माण झालेली अनेक आव्हाने सोडविण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्वपूर्ण व पूरक ठरतो. जागतिक समस्यावर, नदी जलवाटप, सीमा सघर्ष, भाषिक व वांशिक राष्ट्रवाद इत्यादीवर
प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासामुळे तोडगा मिळेलच असे कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु
प्रत्येक प्रदेशात, विभागात व ग्रामपंचायत स्तरावर ज्या
समस्या असतात, त्याची भौगोलिक पाश्र्वभूमी लक्षात घेतल्यास
सुवर्णमध्य भूगोलाच्या अभ्यासामुळे मिळू शकतो. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास न करता
केलेले नियोजन हे अर्थिकदृष्टया घातक ठरते असे आता लक्षात येउ लागले आहे.
पशूपालन,
खाणकाम, कृषी उद्योग, कृत्रीम
जलाशय निर्मिती, वाहतूक औद्योगिकीकरण, पर्यटन,
वसाहतीची निर्मिती या मानवी क्रियाच्यामुळे निसर्गाच्या गुणवत्तेची
हानी होते. ती पूर्णपणे मानव थांबवू शकत नाही. मात्र अशा हानीचा वेग मात्र निश्चित
पणे रोखू शकतो. प्राकृतिक घटकाच्या सर्व संबधीत घटकांचा स्थानिक व व्यापक पातळीवर
अभ्यास केल्यानेच हे शक्य आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीचे
तंत्र प्रभावीपणे वापरून प्राकृतिक भूगोल तज्ज्ञांनी नौसर्गिक घडामोडी व त्याचे
अवकाशीय वितरण व समस्या आणि त्यांचे निराकरण या संदर्भात खूपच प्रगती केलेली आहे.
यामुळे पर्वतीय प्रदेशातील भूमीपात,
सागरपातळीच्या हालचाली पूर व चक्रिवादळे या सदर्भात पूर्वानुमान
वर्तवणे शक्य झालेले असून त्याबद्दल आता उपाययोजना करणेही शक्य आहे. अद्ययावत
प्राकृतिक माहितीचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधूनिक काळात होत आहे. सद्या
जगात प्राकृतिक भूगोलाचा हा अभ्यास दृष्ठिकोन रूढ होताना दिसत आहे.
दिर्घोत्तरी प्रश्न
१.प्राकृतिक
भूगोलाच्या व्याख्या सांगून व्याप्ती स्पष्ठ करा.
२. प्राकृतिक भूगोलाच्या विविध उपशाखा विशद करा.
३. प्राकृतिक
भूगोलाचे महत्व सविस्तर लिहा.
दिलेल्या लिंक वर क्लिक करा व प्राकृतिक भूगोलाच्या फ्रि नोटस मिळवा
https://urlzs.com/qHN5V